या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, चक्रीवादळाचा तडाखा बसणार, 100 किमी प्रतितास वेगाने वाहणारं वारे !

IMD Weather Alert : बंगालच्या उपसागरात वादळ तयार होत आहे, असे आयएमडीने शुक्रवारी सांगितले. हे वादळ शनिवारी रात्रीपर्यंत तीव्र चक्रीवादळ होईल. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, चक्रीवादळाचा तडाखा बसणार, 100 किमी प्रतितास वेगाने वाहणारं वारे !

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. हे हंगामातील पहिले चक्रीवादळ असून, त्याचे नाव रेमल ठेवले आहे, जे ओमानने दिले आहे.

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, चक्रीवादळाचा तडाखा बसणार, 100 किमी प्रतितास वेगाने वाहणारं वारे !

आयएमडीने शुक्रवारी सांगितले की, हे चक्रीवादळ शनिवारी रात्रीपर्यंत तीव्र होईल. पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यानच्या किनाऱ्यावर ते धडकणार आहे. रविवारी चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. 26 ते 27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगालच्या दक्षिण आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. 26-27 मे रोजी दक्षिण 24 परगणामध्ये वाऱ्याचा वेग 100 ते 110 किमी प्रति तास तर उत्तर 24 परगणामध्ये 90 ते 110 किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे.कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये येत्या दोन दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेग 80 ते 100 किमी प्रति तास असू शकतो.

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, चक्रीवादळाचा तडाखा बसणार, 100 किमी प्रतितास वेगाने वाहणारं वारे !

ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये २७-२८ मे रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. वादळ किनारपट्टीवर आदळल्यास पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारी भागात 1.5 मीटर उंच लाटा येऊ शकतात. हवामान विभागाने समुद्रात असलेल्या मच्छिमारांना २७ मे पर्यंत किनाऱ्यावर परत येण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment