PM Vidyalaxmi yojana : प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना (PM Vidya Laxmi Yojana) भारत सरकारने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना (PMVLY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) योजनेअंतर्गत गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणतेही तारण किंवा हमीदाराशिवाय दिले जाते.
योजनेचा उद्देश आणि वैशिष्ट्ये
विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पैशाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये हा आहे. ही योजना विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः डिजिटल पद्धतीने उपलब्ध आहे. कर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालक्ष्मी पोर्टलवर (www.vidyalakshmi.co.in) जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जदाराला अनेक बँकांच्या योजनांची तुलना करून त्यानुसार अर्ज सादर करता येतो.
कर्जाची रक्कम आणि परतफेडीची सुविधा
विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही तारणाशिवाय मिळते.
कर्जाची परतफेड विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या वाढीव कालावधीसह सुरू होते.
परतफेडीचा कालावधी कोर्स आणि बँकेनुसार बदलू शकतो.
अर्ज प्रक्रिया
विद्यालक्ष्मी पोर्टलला भेट द्या: www.vidyalakshmi.co.in
नोंदणी करा आणि लॉगिन करा.
शिक्षण कर्ज अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
विविध बँकांच्या योजना पाहून योग्य योजना निवडा आणि अर्ज सादर करा.
योजनेचा लाभ का घ्यावा?
गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी तारणविना कर्ज सुविधा.
परतफेडीसाठी लवचिक कालावधी.
एकाच पोर्टलवरून अनेक बँकांच्या योजनांचा पर्याय.
शासन मान्यताप्राप्त डिजिटल प्रक्रिया. या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींवर मात करून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळते.